पुस्तकं आयुष्यात येतात…
लेखकाच्या अनुभवाला आलेलं वास्तव आणि त्याच्या प्रातिभ कल्पना यांची सरमिसळ जेवढी बेमालूम, तेवढा त्याचा परिणाम अधिक हेही कळतं. पण तरी ज्या विश्वासानं तो या कल्पित वास्तवाशी तादात्म्य पावतो, त्यातून जाणीवेची वाट उजळते, पुस्तक उमलतं, संवाद करायला लागतं. लेखकाचं बोट सोडून हळव्या, दुखऱ्या जागा उलगडून सांगायला लागतं. निव्वळ घटनात्मक तपशील ओलांडत वास्तव संवादी होतं........